Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेला धुतल्याचं फळ मिळालं, वैभवला थेट आयसीसीकडून मिळाली गुड न्यूज

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात नुकतीच मालिका पार पडली. जी भारतीय संघाने जिंकली. या मालिकेत विशेष लक्ष हे वैभव सूर्यवंशीवर होते. कारण मागील दोन मालिकेत त्याला विशेष कामगिरी करता आलेली नव्हती. वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत दमदार कमबॅक केला. 

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेला धुतल्याचं फळ मिळालं, वैभवला थेट आयसीसीकडून मिळाली गुड न्यूज
| Updated on: Jul 29, 2026 | 3:14 PM
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात नुकतीच मालिका पार पडली. जी भारतीय संघाने जिंकली. या मालिकेत विशेष लक्ष हे वैभव सूर्यवंशीवर होते. कारण मागील दोन मालिकेत त्याला विशेष कामगिरी करता आलेली नव्हती. वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत दमदार कमबॅक केला.  वैभवने या मालिकेत एकूण 151 धावा केल्या.  हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध भारताने नुकत्याच जिंकलेल्या 3-0 मालिका सामन्यादरम्यान, सूर्यवंशीने 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्या आणि आपला पहिला ‘मालिकावीर’ पुरस्कार पटकावला. वैभवचे यानंतर सर्वत्र कौतुक झाले. आता वैभवचा याला मोठा फायदा झाला आहे. वैभवला आता आयसीसीकडून मोठी गुड न्यूज मिळाली आहे.

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयसीसीच्या पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत लक्षणीय झेप घेतली आहे.  त्याच्या प्रभावी कामगिरीचा परिणाम बुधवारी आयसीसीने अद्ययावत केलेल्या साप्ताहिक क्रमवारीत स्पष्टपणे दिसून आला. वैभवने एकूण 230 स्थानांची झेप घेतली असून, टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत 48 व्या स्थानावर पोहोचून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले आहे. त्याचा संघसहकारी इशान किशन या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

झिम्बाब्वेमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर, किशननेही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले. या डावखुऱ्या फलंदाजाने शानदार 81 धावा केल्या आणि 916 गुण मिळवले, जे आतापर्यंतचे तिसरे सर्वोत्तम फलंदाजी रेटिंग आहे. केवळ त्याचा संघसहकारी अभिषेक शर्मा (931 रेटिंग गुण) आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान (919) हेच त्याच्या पुढे आहेत. मालिकेच्या अखेरीस किशनचे रेटिंग 910 गुणांपर्यंत घसरले, परंतु तो दुसऱ्या क्रमांकावरील साहिबजादा फरहान (848) पेक्षा खूप पुढे आहे.

आता भारतीय संघ थेट ऑगस्ट महिन्यात मैदानात उतरणार आहे. यावेळी ते श्रीलंकाविरुद्ध खेळतील. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वैभव खेळताना दिसणार नाही. कारण श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामने असणार आहेत. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना हा 15 ऑगस्ट 2026 रोजी खेळवला जाईल. दुसरा कसोटी हा सामना 23 ऑगस्ट 2026 रोजी खेळवला जाणार आहे. आता या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us