
आजकाल अनेकजण “फोन एक्सपायर झाला” असा शब्द ऐकून गोंधळतात. पण स्मार्टफोन म्हणजे दूध-ब्रेडसारखी एक्सपायरी डेट असलेली वस्तू नाही. इथे Expire म्हणजे कंपनीकडून त्या फोनसाठी सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स बंद होणे. जेव्हा मोबाईल कंपनी काही वर्षांनंतर अपडेट देणे थांबवते, तेव्हा तो फोन तांत्रिकदृष्ट्या एक्सपायर मानला जातो.अशा फोनमध्ये नवीन सुरक्षा पॅच नसल्यामुळे हॅकर्स आणि स्कॅमर्सना त्यातील कमकुवतपणा शोधून डेटा चोरणे, बँकिंग ॲप्स हॅक करणे किंवा फसवणूक करणे सोपे जाते. त्यामुळे फोनमध्ये असलेले फोटो, कॉन्टॅक्ट्स, पासवर्ड आणि बँकिंग माहिती धोक्यात येऊ शकते.
स्मार्टफोन एक्सपायर म्हणजे नेमकं काय?
स्मार्टफोन “एक्सपायर” होणे म्हणजे त्या फोनला कंपनीकडून सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळणे बंद होणे. फोन लॉन्च करताना कंपनी सांगते की या मॉडेलला 5 वर्षे, 7 वर्षे किंवा ठराविक कालावधीपर्यंत अपडेट्स दिले जातील. हा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून नवीन अपडेट्स येणे थांबते. त्यामुळे फोनमध्ये आढळणाऱ्या सुरक्षेतील त्रुटी दुरुस्त केल्या जात नाहीत. परिणामी, सिक्युरिटी अपडेट न मिळाल्यामुळे फोनची सुरक्षितता कमी होते आणि हॅकिंग किंवा फसवणुकीचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, अपडेट्स बंद झालेला फोन वापरताना अधिक काळजी घेणे किंवा शक्य असल्यास नवीन अपडेट्स मिळणारा फोन वापरणे अधिक सुरक्षित ठरते.
कमकुवत सिक्युरिटी असलेले फोन हॅकर्ससाठी सोपे लक्ष्य ठरतात. सुरक्षेतील दुर्बलतचा फायदा घेत आणि हॅकर्स सहज तुमच्या फोनची सुरक्षा तोडून तुमच्या मोबाईलवर ताबा मिळवू शकतात. एकदा त्यांना प्रवेश मिळाला की तुमच्या फोनवर येणारे OTP, महत्त्वाच्या फाइल्स, फोटो, कॉन्टॅक्ट्स तसेच बँकिंग आणि इतर ॲप्सची माहिती त्यांच्या हाती जाऊ शकते. यामुळे आर्थिक फसवणूक, डेटा चोरी किंवा माहितीचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच मोबाईलची सुरक्षा मजबूत ठेवणे आणि नियमित अपडेट्स घेणे अत्यंत गरजेचे आहे.
यापासून वाचण्याचा मार्ग काय ?
जर तुम्हाला हॅकर्सपासून तुमच्या फोनमधील महत्त्वाचा डेटा आणि पैसे सुरक्षित ठेवायचे असतील, तर कंपनीकडून अपडेट्स मिळणे थांबल्यावर फोन बदलण्याचा विचार करणे योग्य ठरेल. कारण सिक्युरिटी अपडेट्स नियमित मिळत राहणे अत्यंत गरजेचे असते.
सिक्युरिटी अपडेट्समुळे फोन सुरक्षित राहतो आणि नवीन धोके टाळता येतात. अपडेट्स बंद झाल्यावर फोनची सुरक्षा हळूहळू कमकुवत होत जाते, त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी वेळेवर निर्णय घेणेच अधिक सुरक्षित ठरते.