नवी दिल्ली: वाहनांची संख्या जशी वाढत आहे तशी वाहनांचा सुरक्षा विमा काढण्याचेही प्रमाण वाढत आहे. यात सरकारी नियमांचाही प्रभाव आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) आकडेवारीनुसार मागील दोन वर्षात 53.7 कोटी रुपयांचे खोटे वाहन सुरक्षा विमा विकले गेले आहेत. या प्रकरणांची संख्या 498 वरुन 1,192 पर्यंत पोहचली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आयआरडीएच्या दिलेल्या आकडेवारीनुसार, 2016-17 मध्ये 498 खोटे विमा विकले गेले. 2017-18 मध्ये या फसवणुकीची संख्या वाढून 823 झाली. तसेच 2018-19 मध्येही ही संख्या वाढून 1192 चा टप्पा पार करुन पुढे गेली.
खोट्या विमांचे तोटे
खोटे विमा विकण्याचे सर्वात जास्त बळी ट्रक चालक आणि दुचाकी वाहक आहेत. हे विमा अशा लोकांनी खरेदी केले ज्यांना प्रवासादरम्यान पोलिसांच्या तपासणीपासून वाचायचे होते. एका वैध विम्याची किंमत 10 हजार रुपयापर्यंत असते. तर खोटा विमा केवळ 5 ते 6 हजार रुपयांमध्ये मिळतो. खोटा विमा घेणाऱ्या बहुतांशी ग्राहकांना संबंधित विमा केवळ पोलीस तपासणीत उपयोगी पडणार असल्याचे माहिती असल्याचेही समोर आले आहे.
पोलीस तपासणीत दंड होऊ नये म्हणून हा विमा
देशातील जवळजवळ 70 टक्के वाहनं विनाविमा सुरु आहेत. आयआरडीएने म्हटले आहे, “आम्हाला 2016 मध्ये AKCPL विमा कंपनी, 2019 मध्ये गोन विमा कंपनी आणि मॅरींस टेक्नोलॉजी या कंपन्यांकडून खोट्या विमा विकल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यातील सर्वाधिक विमा जुन्या गाड्यांसाठी खरेदी करण्यात आले होते. त्याचा उद्देश दंडापासून वाचणे हा होता.”
खरा विमा आणि खोटा विमा कसा ओळखाल?
जर तुम्हीही वाहन विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरा आणि खोटा विमा यातील फरक करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग होऊ शकेल.