मिरची खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं? वाचा

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिरचीचा तिखटपणा पाण्याने कमी होत नाही. जोपर्यंत आपण पाणी पित राहतो तोपर्यंत आपल्याला दिलासा मिळतो.

मिरची खाल्ल्यावर डोळ्यातून पाणी का येतं? वाचा
chillies pungent
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 15, 2023 | 5:57 PM

जेवण स्वादिष्ट करण्यासाठी विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. असाच एक मसाला म्हणजे मिरची. मिरचीमुळे जेवणाची चव वाढते. काही लोकांना नॉर्मल तिखट पदार्थ आवडतात, तर काही लोकांना जास्त तिखट आवडतात. या दोन्ही पदार्थांमध्ये मिरचीचा वापर केला जातो. मिरची केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी अनेक फायदे देते. काही लोक जेवणात लाल मिरची वापरतात, तर काही लोक हिरवी मिरची वापरतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की थेट मिरची खाल्ल्यावर डोळ्यात अश्रू का येतात?

जास्त मसालेदार मिरची खाल्ल्याने कधीकधी तोंडात आणि पोटात जळजळ होते. याशिवाय मिरची कापताना हाताला जळजळ होते. त्यात कॅप्सॅसिन नावाचे कंपाऊंड असते, जे त्याच्या बीजभागात असते.

कॅप्सॅसिन हे कंपाऊंड आहे जे मिरची तिखट बनवते. जेव्हा हे कंपाऊंड आपल्या त्वचेच्या आणि जीभेच्या संपर्कात येते तेव्हा ते आपल्या रक्तात पी नावाचे रसायन सोडते, ज्यामुळे मेंदूत उष्णता आणि जळजळ होण्याचे संकेत तयार होतात आणि यामुळे मिरची लागते (तिखट लागते).

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिरचीचा तिखटपणा पाण्याने कमी होत नाही. जोपर्यंत आपण पाणी पित राहतो तोपर्यंत आपल्याला दिलासा मिळतो. असे होते कारण कॅप्सॅसिन पाण्यात विरघळत नाही. त्याची तडतड शांत करण्यासाठी आपण दही, साखर किंवा दूध खाऊ शकता.

“कॅरोलिना रीपर” ला जगातील सर्वात तिखट मिरचीचा मान मिळाला आहे. विशेषत: अमेरिकेत या मिरचीचे पीक घेतले जाते. ती थोडी शिमला मिरचीसारखी दिसते. या मिरचीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.