AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nipah virus : निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, या राज्यात 4 जणांना लागण, इतर राज्यांना सतर्कतेचा इशारा

कोरोना पेक्षाही घातक आजाराने भारतात शिरकाव केला आहे. त्या आजाराची चार लोकांना लागण झाली आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे आरोग्य विभाग काळजी घेत आहे. इतर राज्यांना सुध्दा या आजाराचा धोका असल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलं आहे.

Nipah virus : निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, या राज्यात 4 जणांना लागण, इतर राज्यांना सतर्कतेचा इशारा
Nipah virusImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 16, 2023 | 12:18 PM
Share

केरळ : केरळ (Keral) राज्यात पुन्हा एकदा संसर्गजन्य आजाराने डोकेवरती काढले आहे. त्या आजाराचं नाव निपाह (Nipah virus) असं आहे. सहा लोकांना त्या आजाराची लागण झाल्याचं ताजी माहिती आहे. त्याचबरोबर दोन लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. केरळ राज्यात अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार सुध्दा तिथल्या घडामोडीकडे लक्ष ठेवून आहे. हा व्हायरल नियंत्रणात आणण्यासाठी तिथली यंत्रणा काम करीत आहे. केरळ राज्याने लोकांच्या मदतीसाठी एक टीम तयार केली आहे. आईसीएमआर यांच्याकडून एक मोबाईल लॅब तयार करण्यात आली आहे. केरळ राज्यात (keral state) ग्रामीण भागात सुध्दा तपासणी करण्यात येत आहे. हा व्हायरल केरळ राज्यातून बाहेर जाऊ शकतो का ? त्याचबरोबर हा आजार कोरोनापेक्षा अधिक डेंजर असल्याचं सुध्दा म्हटलं जात आहे.

या राज्यांना दिला अलर्ट

केरळ राज्यात या आजाराला नियंत्रित करण्यासाठी सरकार विविध पध्दतीचे प्रयत्न करीत आहे. कारण त्या आजाराचे परिणाम दुसऱ्या राज्यावर होण्याचे संकेत अधिक आहेत. निपाह हा व्हायरल एकमेकांच्या संपर्काने पसरतो. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात हा आजार पसरण्याची शक्यता आहे. ICMR इतर राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. राजस्थान राज्याला सुध्दा अलर्ट देण्यात आला आहे.

२०१८ मध्ये १७ लोकांचा मृत्यू

कर्नाटक राज्यात सुध्दा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर परराज्यातून येणाऱ्या लोकांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. निपाह आजार कर्नाटक राज्यात येऊ नये, यासाठी तिथली यंत्रणा सर्वतोपरी पर्यत्न करीत आहे. २०१८ मध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला होता.

या दोन राज्यांना अधिक धोका

निपाह आजारामुळे ३० ऑगस्टला मृत्यू झाला होता. त्याचं कारण आता समजलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत सहा लोकांची ओळख पटली आहे. २५० लोकांना लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १२ लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यातं आलं आहे. रुग्ण डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याला अधिक धोका आहे.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?