एलआयसीच्या योजनेत एकदाच पैसे भरा आणि आयुष्यभर 12 हजार रुपये मिळवा

| Updated on: Sep 17, 2021 | 11:00 AM

LIC scheme | सिंगल लाईफ पॉलिसी ही एकाच व्यक्तीच्या नावावर असेल. त्यामुळे पेन्शनधारक जिवंत असेल तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. तर संयुक्त जीवन योजनेत पती-पत्नी अशा दोघांना कव्हर केले जाईल.

एलआयसीच्या योजनेत एकदाच पैसे भरा आणि आयुष्यभर 12 हजार रुपये मिळवा
Follow us on

मुंबई: जर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल तर भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. या पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना आहे. एलआयसी सरल पेन्शन योजना हा एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे. 1 जुलैपासून ही योजना सुरु झाली आहे.

सरल पेन्शन योजना घेण्यासाठी काय कराल?

एलआयसी सरल पेन्शन स्कीमचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लाइफ अॅन्युइटी विथ 100% रिटर्न ऑफ परचेस प्राईस आणि दुसरी पेन्शन योजना म्हणजे संयुक्त जीवन.

सिंगल लाईफ पॉलिसी ही एकाच व्यक्तीच्या नावावर असेल. त्यामुळे पेन्शनधारक जिवंत असेल तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. तर संयुक्त जीवन योजनेत पती-पत्नी अशा दोघांना कव्हर केले जाईल. या दोघांपैकी कोणीही शेवटपर्यंत जिवंत राहील त्याला पेन्शन मिळत राहील. दोघांचाही मृत्यू झाला तर वारसदाराला बेस प्राईसचे पैसे मिळतील.

सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये काय?

* विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याचे पेन्शन सुरू होईल.
* आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला दरमहा किंवा तिमाहीत पेन्शन हवी आहे, अर्धवार्षिक किंवा वार्षिक. तुम्हाला हा पर्याय स्वतः निवडावा लागेल.
* ही पेन्शन योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेता येते.
* या योजनेमध्ये किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
* ही योजना 40 ते 80 वर्षांच्या लोकांसाठी आहे.
* या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर कधीही कर्ज मिळेल.

पोस्टाच्या योजनेत महिन्याला 2850 रुपये जमा करा आणि मिळवा 14 लाख रुपये

पोस्ट ऑफिस योजना सुरक्षेच्या दृष्टीने चांगली मानली जाते. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी, ग्राम सुमंगल पोस्ट ऑफिस ग्राम सुमंगल खूप उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही दरमहा 2850 रुपये गुंतवले तर तुम्हाला 14 लाख रुपये मिळू शकतात. ग्रामीण टपाल कार्यालयाच्या वतीने ग्रामीण लोकसंख्येचा विमा काढण्याच्या उद्देशाने 1995 मध्ये ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) सुरू करण्यात आला.

RPLI लोकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन सहा प्रकारच्या विमा पॉलिसी देते. एवढेच नाही तर, या योजनेमध्ये, पॉलिसीधारकाच्या अस्तित्वावर म्हणजेच पैसे गुंतवलेल्या रकमेच्या परताव्यावर पैसे परत करण्याचा लाभ देखील उपलब्ध आहे. ग्राम सुमंगल योजनेमध्ये लाभार्थ्याला मॅच्युरिटी वर बोनस देखील मिळतो. ही योजना दोन कालावधीसाठी उपलब्ध आहे. पहिली 15 वर्षे आणि दुसरी 20 वर्षे. या योजनेसाठी किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 45 वर्षे आहे. कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

संबंधित बातम्या:

LIC ची भन्नाट योजना, 200 रुपयांची गुंतवणूक करा आणि 17 लाख रुपये मिळवा

दिवसाला केवळ 63 रुपये भरा आणि 7 लाख मिळवा, LIC ची खास योजना नेमकी काय?

LIC ची जीवन अमर पॉलिसी, फीचर्स चेक करा, तुमच्यासाठी किती फायदेशीर?