Aurangabad | औरंगजेबाची कबर कायमस्वरुपी बंद करावी : आबासाहेब पाटील
औरंगाबाद येथे औरंगजेबच्या कबरीवरून सध्या वातावरण चांगलेच गरम आहे. त्यातच आता या वादात क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. तर क्रांती मोर्चाकडून औरंगजेबाची कबर कायमस्वरुपी बंद करा असे म्हटलं आहे
औरंगाबादः एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर राज्य शासनाने त्या कबरीला बंदोबस्त ही पुरवला त्यावरूनही राज्यातील हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांनी टीका केली. त्यामुळे पुरातत्व विभागाने वादग्रस्त ठरलेली औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) पर्यटकांसाठी (Tourist)पाच दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच जर हा वाद शांत झाला नाही आणि आहे तशीच स्थिती राहीली तर पुन्हा पाच दिवस कबरीचे दर्शन बंद केले जाणार आहे. यावर आता क्रांती मोर्चाकडून या कबरीचे दर्शनच देऊ नये असे म्हटले आहे. तर औरंगजेबाची कबर कायमस्वरुपी बंद करा असे क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.

शारीरिक संबंधासाठी सर्वोत्तम वेळ कोणती! काय आले संशोधनातून समोर?

WPL Auction 2024: यूपी वॉरियर्सने 2.10 कोटीत घेतले पाच खेळाडू, कोण ते जाणून घ्या

'कडक सिंह' ची अभिनेत्री संजना सांघी हीची कडक अदा

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड राहणार की जाणार? जय शाहांच्या वक्तव्याने संभ्रम

हाय हाय, हिना खानच्या या लुकवर चाहते घायाळ

सूर्य देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी हे उपाय करा
Latest Videos