अहमदनगरमध्ये वादळी वा-यासह पावसाचा हाहा:कार; पिकांचं मोठं नुकसान, दोघांचा मृत्यू
अहमदनगरमध्ये गारपीट; पिकं आणि घरांचं नुकसान, पाहा व्हीडिओ...
नेवासा, अहमदनगर : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होतंय. वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. तर अहमदनगर जिल्हयात दोघांचा मृत्यू झालाय. अहमदनगर जिल्हयात नेवासा , राहाता , कोपरगाव , श्रीरामपुर तालुक्यातील अनेक गावात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. नेवासा तालुक्यात विविध भागात गारांच्या पावसाने हजेरी लावली. नेवासा तालुक्यातील नेवासा शहरासह मुळाकाठ परिसरातील करजगाव, पानेगाव, शिरेगाव, वाटापुर, अंमळनेर, निंभारी, गोणेगाव, पाचेगाव, पुणतगाव, सोनईसह परिसरात ढगांचा गडगडाट, जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतपिकांसह फळबागांचं मोठ नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

