अजितदादांच्या दुर्घटनेच्या चौकशीच्या मागणीसाठी गावाची गावबंद हाक
बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करत गावबंद पाळला आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि ब्लॅक बॉक्सची माहिती सार्वजनिक करण्याची त्यांची मागणी आहे, तसेच महाराष्ट्रातील इतर गावांनाही साखळी बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.
बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावाने आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करत गावबंद पुकारला आहे. गावातील सर्व ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने मुख्य चौकात जमा झाले होते. ग्रामस्थांच्या मते, 28 जानेवारी रोजी अजित पवारांचे निधन अपघाती नसून, तो घातपात आहे. वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमुळे त्यांच्या मनात हा दाट संशय बळावला आहे.
ग्रामस्थांनी सरकारकडे मागणी केली आहे की, देवगिरी ते विमानतळापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावेत आणि ब्लॅक बॉक्समधील माहिती जनतेसमोर मांडावी. हा अपघात नसून घातपात असल्याची शंका असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर यावे, अशी त्यांची मागणी आहे. न्याय मिळेपर्यंत लोणी भापकर गाव बंद ठेवण्यात येणार असून, बारामती तालुक्यातील इतर गावांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बलुतेदार संघटनेनेही या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.
Published on: Feb 22, 2026 12:38 PM
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
