“…हा तर भाजपचा कुटील डाव”, अंबादास दानवे यांचा आरोप
उद्धव ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केलीय. पाहा...
दत्ता कानवटे, औरंगाबाद : उद्धव ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर (BJP) टीका केलीय. हा निर्णय निवडणूक आयोगाने कोणात्या दबावाखाली घेतला आहे? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं अंबादास दानवे म्हणालेत. तसंच या निर्णयावरून गल्लीतील लहान मुलगाही सांगेल की हा निर्णय दबावाखाली घेण्यात आला आहे, असंही ते म्हणालेत. चिन्ह गोठवणं शिंदे गटाचा हा अट्टाहास होता का ? हा भाजपचा कुटिल डाव आहे. त्यांना स्पर्धक म्हणून कुठलाही राजकीय पक्ष नको आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले.
Published on: Oct 09, 2022 10:46 AM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
