… अन् फर्नांडीस कुटुंबाच्या संघर्षाचा विजय, अंजली दमानिया यांचा काय होता भुजबळांवर गंभीर आरोप?
दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबाची जमिनीसंदर्भातील व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. इतकंच नाही तर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फसवणुकीचे आरोपही केले होते. दरम्यान २० वर्षांनंतर फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळाल्याचे दमानिया यांनी म्हटले
मुंबई, २ जानेवारी २०२३ : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबाची जमिनीसंदर्भातील व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. इतकंच नाही तर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फसवणुकीचे आरोपही केले होते. दरम्यान २० वर्षांनंतर फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. याप्रकरणावर बोलताना अंजली दमानिया असे म्हणाल्या, ‘डोरीन फर्नांडिस यांचे ८.५० करोड रुपये छगन भूजबळ यांनी २० वर्ष दिले नव्हते, पण आज त्यांना ते द्यावे लागले. डोरीनचा बंगला भुजबळांच्या परवेज कंस्ट्रक्शनने डीमोलिश केला, मात्र एक दिड दमडी त्यांना दिली नव्हती. मात्र आज २० वर्षानंतर हे पैसे मिळाले, राजकारणी निर्दयी आणि अमानुष आहेत. छगन भूजबळ हे निर्दयी आणि अमानुष राजकारणी आहेत. अनेक वेळा समजावूनही त्यांनी ऐकले नाही, जानेवारी २००८ ला ठरलं की पैसे द्यायचे पण नंतर इडीच्या दबावामुळे त्यांना देता येत नाही असं कारण दिलं’, असे त्यांनी म्हटले.
Published on: Jan 02, 2024 04:40 PM
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
