नवी मुंबईच्या APMC मध्ये मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा, मार्केटमध्ये शुकशुकाट
मराठा समाजाच्या आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह अंतरवाली सराटी ते थेट मुंबईत.. मुंबईच्या अगोदर नवी मुंबई एपीएमसी धान्य मार्केट या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे विराट सभा घेणार आहे. त्यासाठी एपीएमसी मार्केट आज आणि उद्या बंद ठेवण्यात आलेलं आहे.
नवी मुंबई, २५ जानेवारी २०२४ : मराठा समाजाच्या आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हजारो मराठ्यांसह अंतरवाली सराटी ते थेट मुंबई या ठिकाणी पदयात्रा काढली आहे. मुंबईच्या अगोदर नवी मुंबई एपीएमसी धान्य मार्केट या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे विराट सभा घेणार आहे. त्यासाठी एपीएमसी मार्केट आज आणि उद्या बंद ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवत नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची देखील सोय मोर्चेकरांसाठी करण्यात आलेले आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी येणार आहे .त्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीस बंदोबस्त आणि एपीएमसी या ठिकाणचे सुरक्षा रक्षक मंडळ तैनात असणार आहे. तर या विराट सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं असताना मनोज जरांगे पाटील हे आपला विराट मोर्चा मुंबईकडे वळवणार की या ठिकाणीच थांबवणार हे देखील पहाणे गरजेचे राहणार आहे.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

