VIDEO | Javed Akhtar defamation case : अभिनेत्री कंगना रणौतवर अटकेची टांगती तलवार

लेखक-दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगना रनौतविरोधात (Kangana Ranaut) बदनामीचा खटला दाखल केला होता, ज्यावर आज (14 सप्टेंबर) अंधेरी न्यायालयात सुनावणी होणार होती. जावेद अख्तर पत्नी शबाना आजमीसह कोर्टात पोहोचले होते. पण, कंगना रनौत आज देखील कोर्टात पोहोचली नाही.

VIDEO | Javed Akhtar defamation case : अभिनेत्री कंगना रणौतवर अटकेची टांगती तलवार
| Updated on: Sep 14, 2021 | 11:03 PM

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतविरोधात (Kangana Ranaut) जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाची आज अंधेरी न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी (बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी) यांच्यासह न्यायालयात पोहोचले. पण, कंगना राणौत आज कोर्टात हजर झाली नाही. (Arrest warrant against Kangana Ranaut if she fails to appear, says court hearing Javed Akhtar defamation case)

कंगना रनौतचे वकील रिजवान सिद्दीकी म्हणाले की, अभिनेत्रीची तब्येत खराब आहे, ज्यामुळे ती न्यायालयात हजर राहू शकली नाही. तिच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहण्यास सूट देण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने अभिनेत्रीला 20 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत. त्याचवेळी न्यायाधीशांनी असेही म्हटले की, कंगना पुढील सुनावणीस न्यायालयात हजर न झाल्यास तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल.

न्यायालयात काय घडले?

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात सांगितले की, कंगना आजारी आहे. त्यामुळे ती न्यायालयात येऊ शकत नाही. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, म्हणून त्यांना आजच्या सुनावणीपासून सूट दिली पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की, कंगनाला कोरोना चाचणी करावी लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अनेक लोकांना भेटली आहे. कंगनाच्या वकिलाने कोर्टात वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केले आहे आणि एक आठवड्याचा वेळही मागितला आहे.

काय म्हणाले जावेद यांचे वकील?

जावेद अख्तरचे वकील म्हणतात की, अनेक नोटिसा देऊनही कंगना कोर्टात येत नाही. त्याचबरोबर तक्रारदार जावेद अख्तर सतत न्यायालयात येत आहेत. तसेच न्यायव्यवस्थेचा सन्मान केला जात नाही. या प्रकरणाला जाणीवपूर्वक विलंब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे, ते म्हणाले.

न्यायाधीशांनी आता 20 सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यावेळी जर कंगना आली नाही, तर तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले जाईल. आता कंगनाला पुढील सुनावणीला हजर राहावे लागेल आणि जर ती कोर्टात आली नाही, तर तिच्या अडचणी वाढू शकतात.

गुन्हा का नोंदवला गेला?

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने काही मुलाखतींमध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात अनेक वक्तव्ये केली. तेव्हा जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात हा खटला दाखल केला होता. यानंतर जावेद यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. त्यांनी अभिनेत्रीवर आपली प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला. तेव्हापासून आजपर्यंत दोघांमधील हे प्रकरण चालू आहे.

बदनामीची कारवाई रद्द करण्याची विनंती

काही दिवसांपूर्वी कंगना रनौतने तिच्यावरील बदनामीची कारवाई रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने अभिनेत्रीची याचिका फेटाळली.

हेही वाचा 

लिहिणाऱ्या हातांना सलाम! गणपती उत्सवात प्रवाह परिवारातील 25 लेखकांचा गणरायाची मूर्ती देऊन सन्मान

Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौराईंचं आगमन, पाहा खास फोटो

‘आमच्या गुटखा किंगसमोर फिका पडतोय हा मार्वल हिरो’, शांग-चीला पाहून प्रेक्षकांना आली अजय देवगणची आठवण!

(Arrest warrant against Kangana Ranaut if she fails to appear, says court hearing Javed Akhtar defamation case)

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.