24 दिवस उलटले तरी शासकीय कार्यालयांची नावं तिचं
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतरही शहरातील शासकीय कार्यालयांची नावे मात्र तशीच आहेत.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एमआयएमने त्याला विरोध केला. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण करत 14 दिवस लढा दिला. मात्र काही हिंदू संघटना आणि मनसेकडून नामांतर समर्थनार्थ आंदोलने तर रमजान आणि संसदेचं अधिवेशनामुळे हे उपोषण रद्द करण्यात येत असल्याची घोषणा जलील यांनी केली.
एकीकडे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतरही शहरातील शासकीय कार्यालयांची नावे मात्र तशीच आहेत. शहराचे नाव बदलून 24 दिवस गेले तरी औरंगाबाद महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयाची नावे अजूनही बदलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही नावे कधी बदलली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...

