‘बच्चू कडू लाचार…’, रवी राणांचा पलटवार, विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा जुंपली
बच्चू कडू आणि रवी राणा पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. बच्चू कडू यांनी भाजपसह रवी राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. दरम्यान, रवी राणा यांनी केलेल्या टीकेनंतर बच्चू कडू यांनी पलटवार केलाय.
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना बच्चू कडू आणि रवी राणा पुन्हा एकदा जुंपली आहे. अचलपूरच्या महायुतीच्या उमेदवारावरून बच्चू कडू यांनी भाजपवर शरसंधान साधत रवी राणांना डिवचलंय. दरम्यान, बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेनंतर रवी राणांनी देखील शाब्दिक हल्ला चढवत पलटवार केलाय. यावेळी रवी राणा यांनी अचलपूरमध्ये भाजपला संपवल्याचा आरोप देखील बच्चू कडू यांनी केलंय. तर याला देखील रवी राणांनी जशासतसं उत्तर दिलंय. ‘रवी राणा अचलपूरमध्ये भाजप संपवणार आम्हाला संपवण्याची गरज नाही’. असं बच्चू कडू म्हणाले तर भाजप खूप मोठा पक्ष आहे. बच्चू कडू लाचार होऊन विधानं करताय. अचलपूरमध्ये परिवर्तन होणार असल्याचे म्हणत रवी राणांनी त्यांच्यावर पलटवार केलाय. यंदा अचलपूरमध्ये बच्चू कडूंना तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात असल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. अचलपूरमध्ये प्रहार संघटनेकडून बच्चू कडू, काँग्रेसकडून अनिरूद्ध देशमुख आणि भाजपकडून प्रवीण तायडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे विजय कोणाचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

