Ravindra Chavan : विलासराव देशमुख यांच्यावर आधी वादग्रस्त विधान अन् आता दिलगिरी, रवींद्र चव्हाण म्हणाले, देशमुख बंधूंच्या भावना दुखावल्या….
विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील या वक्तव्यावरून रविंद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. देशमुख कुटुंबाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो, असे चव्हाण यांनी म्हटले. अमित आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेकांनी या वक्तव्याचा निषेध केला होता.
विलासराव देशमुख यांच्यावरील वक्तव्यावरून राज्याचे राजकारण तापले होते. या पार्श्वभूमीवर, आमदार रविंद्र चव्हाण यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “देशमुख बंधूंच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असे चव्हाण यांनी म्हटले आहे. यापूर्वी लातूर येथे बोलताना रविंद्र चव्हाण यांनी “लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील,” असे विधान केले होते.
काँग्रेसकडून विलासराव देशमुख यांच्या नावाचा वापर मतदानासाठी केला जात असल्याने, आपण महायुतीच्या विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या संदर्भात तसे म्हटले होते, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विलासराव देशमुख यांचे पुत्र, आमदार अमित देशमुख यांनी चव्हाण यांच्या वक्तव्याला दुर्दैवी म्हटले, तर अभिनेते रितेश देशमुख यांनी “जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत,” असे म्हटले होते. या राजकीय वादानंतर, आपले वक्तव्य कोणाच्या भावना दुखावण्यासाठी नव्हते, परंतु जर तसे झाले असेल तर आपण दिलगीर आहोत, अशी भूमिका रविंद्र चव्हाण यांनी घेतली आहे.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका

