EP1: Bas Evdhach Swapn | प्रवासी मजुरांच्या बजेटकडून अपेक्षा काय? Money9
गेल्या दोन वर्षात यांना काय मिळालं आणि बजेटमधून यांना काय मिळू शकतं ? अरविंदसारख्या लाखो प्रवासी मजुरांची बजेटकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेऊयात. पहिल्या लॉकडाऊनमध्ये कारखान्यातील काम बंद पडल्यानं मुंबईहून बिहारला अरविंद चालत गेला. आजही त्या क्षणाची आठवण काढल्यानंतर अरविंदच्या अंगावर काटा येतो.
मुंबईः लॉकडाऊन (Lockdown) नंतर हजारो प्रवासी मजुरांची (Migrant Labour) रस्त्यावरील गर्दी पाहून देशातील अनेक जणांना प्रवासी मजुरांबद्दल प्रथमच माहिती मिळाली. गेल्या दोन वर्षात यांना काय मिळालं आणि बजेटमधून यांना काय मिळू शकतं ? अरविंदसारख्या लाखो प्रवासी मजुरांची बजेटकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेऊयात. पहिल्या लॉकडाऊनमध्ये कारखान्यातील काम बंद पडल्यानं मुंबईहून बिहारला अरविंद चालत गेला. आजही त्या क्षणाची आठवण काढल्यानंतर अरविंदच्या अंगावर काटा येतो. 1700 किलोमीटरचा प्रवास खूपच दु:खदायक होता. गावात पोहचल्यानंतर सर्वकाही व्यवस्थित होईल अशी अरविंदला अपेक्षा होती. मात्र, गावात तर त्याच्या वडिलांनाही मनरेगाचं (MNREGA) काम मिळत नव्हतं. अरविंदवरच कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असल्यानं कामावर असताना तो दर महिन्याला काही रक्कम घरी पाठवत होता.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

