Buldhana Flood : सरकार मायबाप…कठीण झालं दादा.. बघा काळजात धस्स करणारा बुलढाण्यातील बळीराजाचा आक्रोश
बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी परिसरात शेतांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून सरकारकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी येथील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी उभी पिके सडून गेली आहेत. या अनपेक्षित नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी या परिस्थितीबद्दल तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे.
आधी उंदरांमुळे नुकसान झाले आणि आता पाण्यामुळे. आम्ही काय करावे? अशा शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली. त्यांना आता भविष्याची चिंता सतावत आहे. सरकारने या संकटाकडे तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. या गंभीर परिस्थितीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांतील शेतकरी चिंतेत आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करावी आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी बुलढाणा येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

