AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीसाठी गृहमंत्र्यांना घेरावं लागेल शिवाजीराव आढळरावांचं गृहमंत्र्यांसमोर वक्तव्य

Bullock Cart Race : “बैलगाडा शर्यतीसाठी गृहमंत्र्यांना घेरावं लागेल” शिवाजीराव आढळरावांचं गृहमंत्र्यांसमोर वक्तव्य

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 9:57 PM
Share

शिवसेनेचे नेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव-आढळराव पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. आढळराव पाटील यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर इशारा दिलाय. गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात बैलगाडा शर्यत होणार असं आढळराव पाटील म्हणाले. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. महत्वाची बाब म्हणजे आढळराव पाटील यांनी गृहमंत्री उपस्थित असलेल्या व्यासपीठावरुनच हे आव्हान दिलं आहे.

बैलगाडा शर्यतीवरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली पोलिसांना गुंगारा देत गनिमीकाव्यानं बैलगाडा शर्यत भरवून दाखवली. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव-आढळराव पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. आढळराव पाटील यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर इशारा दिलाय. गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात बैलगाडा शर्यत होणार असं आढळराव पाटील म्हणाले. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. महत्वाची बाब म्हणजे आढळराव पाटील यांनी गृहमंत्री उपस्थित असलेल्या व्यासपीठावरुनच हे आव्हान दिलं आहे.

दुसरीकडे बैलगाडा शर्यती दरम्यान जिथे गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे मागे घेऊ आणि लोकांची यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करु, असं मोठं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, असं असलं तरी वळसे-पाटील यांनी शेतकऱ्यांना अजून एक आवाहन केलं आहे. पुढे खटले दाखल होणार नाही म्हणून बैलगाडा शर्यत भरवू नका, असं वळसे पाटील म्हणाले.