AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhajinagar मध्ये आदर्शच्या ठेवीदारांचा मोर्चा, पोलीस अन् आंदोलक एकमेकांना भिडले, नेमकं काय घडलं?

Sambhajinagar मध्ये आदर्शच्या ठेवीदारांचा मोर्चा, पोलीस अन् आंदोलक एकमेकांना भिडले, नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 17, 2023 | 7:50 AM
Share

tv9 Special Report | छत्रपती संभाजीनगरातील आदर्श पतसंस्थेला संचालक मंडळानेच २०० कोटीनं लुटलं, आदर्श नागरी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात इम्तियाज जलीलांच्या नेतृत्वात निघाला मोर्चा, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई, १७ सप्टेंबर २०२३ | आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या कोट्यावधी ठेवी अडचणीत आल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरातील या पतसंस्थेला संचालक मंडळानेच २०० कोटीनं लुटलंय. त्यासाठी संभाजीनगरमध्ये यासाठी मोर्चा निघाला. यानंतर गिरीश महाजन यांनी पतसंस्थेची प्रॉपर्टी विकून पैसे परत करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनीही दिले. छत्रपती संभाजीनगरात मोठा मोर्चा निघाला. आदर्श नागरी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात इम्तियाज जलीलांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. 40 ते 50 हजार ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आल्यानं मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा मुहूर्त साधत मोर्चा निघाला. मात्र पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करताच, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली.

भडकल गेटवरुन निघालेला मोर्चा स्मार्ट सिटी ऑफिसच्या दिशेनं निघाला. याच ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक सुरु होती. त्यामुळं पोलिसांचा ताफाही तैनात होताच. तर खासदार इम्तियाज जलील मंत्र्यांच्या भेटीसाठी आग्रही होते. अखेर ज्या ठिकाणी हमखास मैदानाजवळ मोर्चा रोखला. तिथं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन आले आणि आदर्श नागरी पतसंस्थेच्या चालकांच्या प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे देऊ असं आश्वासन मंत्री महाजनांनी दिलं. नेमका काय प्रकार घडला, बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 17, 2023 07:50 AM