सत्तासंघर्षावरील न्यायलयाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… ही आमची अपेक्षा
VIDEO | राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा..
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नियमित सुनावणी घेणार असल्याचे म्हटले आहे. सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मेरीटवर निर्णय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. सरकार बहुमताचं आहे. कायद्याद्वारे स्थापित झालं आहे. सर्व नियम पाळून सरकार आलं आहे. लोकशाहीत घटना, कायदा आणि नियम आहेत त्यामुळे बहुमताला मोठं महत्त्व आहे. राज्यात बहुमताचं सरकार काम करत आहे. गेल्या ७ महिन्यांपासून लोकांच्या मनातील गरजा आणि आवश्यक बाबींची पूर्तता पूर्ण करत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात मेरीटवर निर्णय व्हावा. कारण हे कायद्याने स्थापित झालेलं सरकार आहे. आमच्याकडे बहुमत आहे. सरकारला कोणताही धोका नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
