…तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही; बावनकुळे यांचा राहुल गांधी यांना इशारा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.
मुंबई : काँग्रेसचे अपात्र खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचा नव्हे तर, संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपच्या राज्यासह देशातील भाजप नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्यावरून राज्यातही भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.
राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचा नव्हे तर, संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला. यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर आल्याचे बावनकुळे म्हणाले. तसेच कोर्टाचा निर्णय राहुल गांधींनी मान्य केला म्हणून त्यांची खासदारकी गेली. मात्र जनतेचा कोर्टात त्यांनी माफी मागीतलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत ते माफी मागच नाहीत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे ते म्हणाले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

