AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | राज्यपालांची कृती, पहाटेचा शपथविधी, आजची सुनावणी; उल्हास बापट यांनी सांगितला यामागचा महत्त्वाचा मुद्दा

VIDEO | राज्यपालांची कृती, पहाटेचा शपथविधी, आजची सुनावणी; उल्हास बापट यांनी सांगितला यामागचा महत्त्वाचा मुद्दा

| Updated on: Feb 14, 2023 | 1:14 PM
Share

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. भगतसिंग कोश्यारी यांची कृती, पहाटेचा शपथविधी आणि आजच्या सुनावणीवर त्यांनी भाष्य केलंय. पाहा...

पुणे : घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. एक निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट अशा दोन महत्त्वाच्या सुनावणी आज होत आहेत. आता जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल तो फायनल असेल. सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर कोर्टाने स्पष्टीकरण द्यायला हवं. महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी घटनाविरोधात कृती केल्या आहेत. मग त्यात अजित पवार यांचा शपथविधी ही येतो, असं उल्हास बापट म्हणालेत. आता अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले गेले. याचा अर्थ 2024 ची निवडणूक येत आहे. जनतेला दाखवण्यासाठी बदलले गेले, असंही उल्हास बापट म्हणाले आहेत.

Published on: Feb 14, 2023 01:14 PM