AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | सहकारी चळवळ संकटात आली आहे - जयंत पाटील

Mumbai | सहकारी चळवळ संकटात आली आहे – जयंत पाटील

| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 9:03 PM
Share

आता सहकार चळवळ क्षीण होत चालली आहे. देशातील लहान गरिबांनी एकत्र येऊन ताकद निर्माण करणे म्हणजे सहकार होय, असे जयंत पाटील म्हणाले. 

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकारावर भाष्य केलं आहे. त्यांनी सहकारी चळवळ संकटात आली असल्याचं मत व्यक्त केलं. आज साखर निर्माण करतानादेखील खासगी क्षेत्रांत स्पर्धा निर्माण झाली. आज देशात खासगीकरणाचा पुरस्कार केला जातोय. त्यामुळे आता सहकार चळवळ क्षीण होत चालली आहे. देशातील लहान गरिबांनी एकत्र येऊन ताकद निर्माण करणे म्हणजे सहकार होय, असे जयंत पाटील म्हणाले.