अन् PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत अजितदादांनी मागितली माफी, म्हणाले….
पीचडी करून काय दिवे लावणार आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य अजित दादांनी विधानसभेत केले. या वक्तव्याप्रकरणी अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यावरूनच विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. याबद्दल अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि असेही म्हटले की माझ्या शब्दांचा विपर्यास
मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : पीचडी करून काय दिवे लावणार आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य अजित दादांनी विधानसभेत केले. या वक्तव्याप्रकरणी अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यावरूनच विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. दुसरीकडे महत्वाचे विषय सोडून मुलं पीएचडी का करतात? असा सवाल अजित पवार यांनी केला. याबद्दल अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि असेही म्हटले की माझ्या शब्दांचा विपर्यास झाला, गाजावाजा केला गेला. तर यासंदर्भात संजय राऊत यांनीही टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले सोम्या गोम्याला उत्तर देत नाही. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप खूप मुलं राजकीय नेत्यांवर पीएचडी करतात. अजित पवार जेव्हा हा मुद्दा मांडत होते. तेव्हा तोच मुद्दा फडणवीस यांनीही अधोरेखित केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा

