Eknath Shinde : ‘विकास की आंधी याचं एकमेव कारण म्हणजे PM मोदी’, शिंदेंकडून मोदींच्या विकासाला सलाम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या दुप्पट वेगाने होत असलेल्या विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला दिले. काँग्रेसने केलेल्या २ लाख कोटींच्या तुलनेत मोदी सरकारने महाराष्ट्राला १० लाख कोटी रुपये दिल्याचे सांगत त्यांनी मोदींचे हात देणारे असल्याचे नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उद्धाटन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षांत दुप्पट वेगाने विकास साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने राज्यात उत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहत आहेत.
शिंदे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे सांगितले, ज्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मोदी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ३३,५६५ कोटी रुपये दिल्याचे नमूद केले.
काँग्रेस सरकारच्या २००४ ते २०१४ या काळातील २ लाख कोटींच्या तुलनेत गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी १० लाख कोटी रुपये दिल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करत, “मोदींचे हात देणारे आहेत. काँग्रेससारखे भ्रष्टाचार करून ओरबाडणारे नाहीत,” असे म्हटले. काँग्रेसचे करप्शन फर्स्ट, तर मोदींचे नेशन फर्स्ट हा फरक त्यांनी अधोरेखित केला.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

