मुनगंटीवार, जोरगेवारांचे मोठे योगदान, आमच्यात…; फडणवीसांचं मोठं विधान
चंद्रपूरमध्ये विजय संकल्प रॅलीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युतीला प्रचंड बहुमत मिळण्याचा विश्वास व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वादाच्या चर्चा फेटाळून लावत, त्यांनी चंद्रपूरच्या विकासात दोघांचेही मोठे योगदान असल्याचे सांगितले. मनसेच्या कोर्टातील भूमिकेवरही फडणवीसांनी जनतेचा कौल महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
चंद्रपूरमध्ये आयोजित विजय संकल्प रॅलीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युतीला प्रचंड बहुमत मिळण्याचा विश्वास व्यक्त केला. चंद्रपूरच्या जनतेने दिलेल्या प्रतिसादातून हा विश्वास अधिक बळावला असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वादाच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. मुनगंटीवार आमचे ज्येष्ठ नेते असून, जोरगेवार आमदार आहेत, त्यांच्यात कोणताही मनभेद नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. चंद्रपूरच्या विकासात मुनगंटीवार, हंसराज भैय्या आणि जोरगेवार यांचे मोठे योगदान आहे. भाजपशिवाय अन्य कोणीही विकासाचे असे काम दाखवू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
युतीच्या राजकारणात काहीवेळा पदे बाहेरच्यांना द्यावी लागतात, त्यामुळे काही त्याग करावे लागतात. चंद्रपूरकडे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेने ६६ बिनविरोध उमेदवारांच्या निवडीवर कोर्टात जाण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर, फडणवीसांनी जनतेचा कौल महत्त्वाचा असल्याचे म्हटले.
Love You बोल... कार्यकर्त्याला दादांचं उत्तर अन् एकच हस्यकल्लोळ
माझ्या आई-वडिलांवर बोललात, शरम.. CM फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्य
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात

