Dharashiv News : जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
Food Poisoning In Dharashiv : धाराशीवच्या उमरगा तालुक्यात जागरण गोंधळातील जेवणातून तब्बल 79 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
जागरण गोंधळातील जेवणातून तब्बल 79 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. धाराशीवच्या उमरगा तालुक्यातल्या कराळी गावात ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये काही बालकांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान, उपचारासाठी 16 जणांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
जेवणातून विषबाधा होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. बहुतांश सार्वजनिक ठिकाणी खाण्यात आलेल्या पदार्थातून विषबाधा होण्याचं प्रमाण वाढलं आहे. धाराशीवमधल्या उमरगा तालुक्यात देखील 79 जणांना जेवणातून विषबाधा झाली आहे. हे सगळे विषबाधा झालेले लोक एक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात जेवले होते. विषबाधा झालेले काहीजण उपजिल्हा रुग्णालायात उपचार घेत आहेत.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
