विरोधकांमुळे आम्ही पक्के होत चाललो आहोत
श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर याविषयी बाळासाहेब थोरात यांना या कारवाईविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, ही कारवाई महाविकास आघाडीतील नेत्यांसाठी ईडीची कारवाई नवीन राहिली नाही. त्याचबरोबर ही कारवाई आता केली जात असली तरी ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे ते भविष्यात नक्की निर्दोष सुटतील असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून […]
श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर याविषयी बाळासाहेब थोरात यांना या कारवाईविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, ही कारवाई महाविकास आघाडीतील नेत्यांसाठी ईडीची कारवाई नवीन राहिली नाही. त्याचबरोबर ही कारवाई आता केली जात असली तरी ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे ते भविष्यात नक्की निर्दोष सुटतील असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून थेट शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबीयांवरच कारवाई केल्यानंतर सरकार काही धोका आहे का या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, विरोधकांकडून जेवढा हा फास घट्ट् केला जात आहे तेवढे आम्ही सरकार चालवण्यासाठी पक्के होत आहोत, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे चालणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

