120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपद! मग नवं सरकार आणून भाजपला फायदा काय?- धनंजय मुंडे
Dhananjay Munde on BJP : अजित पवारांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याला मुबलक निधी मिळाल्याचा पुनरुच्चार धनंजय मुंडे यांनी केला. अजित पवारांच्या काळात आमचं शिस्तीचं सरकार होतं, आता सरकार बेशिस्त असल्यासारखं वागतंय, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
बीड : 120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपदावर भाजपला (Bhartiya Janata Party) समाधान मानावं लागलं, मग नवं सरकार आणून भाजपला फायदा काय झाला, अशा शब्दांत धनंजय मुंडे (Beed Dhananjay Munde) यांनी टीका केली. ते बीडमधील सभेत बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांच्या हजेरी घेण्यात आलेल्या या सभेत धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे आभारही मानले. अजित पवारांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याला मुबलक निधी मिळाल्याचा पुनरुच्चार धनंजय मुंडे यांनी केला. अजित पवारांच्या काळात आमचं शिस्तीचं सरकार होतं, आता सरकार बेशिस्त असल्यासारखं वागतंय, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने भरीव काम केल्याचंही आठवण धनंजय मुंडे यांनी करुन दिली.
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

