Womens World Cup Final : आफ्रिकेला नमवणार, वर्ल्डकप आणणार; महिला विश्वचषकाचा आज रंगणार अंतिम सामना
आज नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असून, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवण्याची संधी आहे. हा सामना क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता देईल.
नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ विजेतेपदासाठी आमनेसामने उभे ठाकणार आहेत. क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे, कारण दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचले असल्याने या स्पर्धेला एक नवा विश्वविजेता मिळणार आहे.
भारतीय महिला संघाने यापूर्वी दोन वेळा (२००५ आणि २०१७ साली) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती, परंतु दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इतिहास रचण्याची तिसरी संधी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्जने केलेल्या दमदार खेळीची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने सात वेळा, इंग्लंडने चार वेळा, तर न्यूझीलंडने एकदा हा विश्वचषक जिंकला आहे. भारताला साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला असल्याने, अंतिम सामन्यात आफ्रिकेचे कडवे आव्हान भारतीय संघासमोर उभे आहे.
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी

