AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Savarkar यांची कविता केली म्हणून Hridaynath Mangeshkar यांना नोकरीवरुन काढलं! : PM Modi

Vinayak Savarkar यांची कविता केली म्हणून Hridaynath Mangeshkar यांना नोकरीवरुन काढलं! : PM Modi

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 2:18 PM
Share

काँग्रेसच्या हायकमांडची नीती तीन प्रकारची आहे. एक म्हणजे डिस्क्रेडिट करा. दुसरी डीस्टॅबलाईज्ड करा, तिसरी म्हणजे डिसमिस करा. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि नंतर बरखास्त करा हे काँग्रेस हायकमांडचं धोरण राहिलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर (congress) जोरदार शाब्दिक हल्ला केला. विशेषतः शरद पवारांचे कौतुक करत राहुल गांधी आणि गांधी परिवारावर जोरदार टोलेबाजी केली. काँग्रेसच्या हायकमांडची नीती तीन प्रकारची आहे. एक म्हणजे डिस्क्रेडिट करा. दुसरी डीस्टॅबलाईज्ड करा, तिसरी म्हणजे डिसमिस करा. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि नंतर बरखास्त करा हे काँग्रेस हायकमांडचं धोरण राहिलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. फारुख अब्दुलांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी देवीलाल यांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी चरणसिंगची सरकार कुणी अस्थिर केलं होतं? पंजाबमध्ये सरदार बादलसिंग यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला होता? कर्नाटकात हेगडेंचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? 50 वर्षापूर्वी डाव्यांचं सरकार कुणी पाडलं होतं? एमजीआरचं सरकार कुणी डिसमिस केलं होतं? आंध्रमध्ये एनटीआरचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? केंद्र सरकारचं ऐकत नाही म्हणून मुलायम सिंह यादव यांना कोणत्या पक्षाने त्रास दिला होता? अशा सवालांच्या फैरीच त्यांनी झाडल्या. विरोधक नेहमी इतिहास बदलण्याचे आरोप करतात. त्याल्याही त्यांनी उत्तर दिले. शिवाय छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव येणारच, असे हसत-हसत सांगितले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झालाय. लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील होते, पण त्यांच्या परिवारासोबत कशाप्रकारे अन्याय करण्यात आला. हे जाणून घ्या…पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होत, असं हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलंय, असा दावा मोदींनी केला.

Published on: Feb 08, 2022 02:00 PM