Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज ‘या’ 6 जिल्ह्यात धुव्वाधार, IMD कडून रेड अलर्ट
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचा यात समावेश आहे. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
हवामान विभागाने महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, राज्यातील इतर पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यात रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, संबंधित प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे राज्यभरात पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर आणि जलमय परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी

