Special Report | विदर्भात पावसाचा कहर,अनेक गावं पाण्यात
हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि देवळी या गावांमध्ये काही नागरिक अडकून पडले होते. अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पुराच्या पाण्याने चारही बाजूने वाढल्याने येथील एका गावात तब्बल 400 जण अडकून पडले होते.
वर्धा: विदर्भात( Vidarbha) पावसाने(rain) अक्षरशः कहर केला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात 24 तासांमध्ये तब्बल 136 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि देवळी या गावांमध्ये काही नागरिक अडकून पडले होते. अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पुराच्या पाण्याने चारही बाजूने वाढल्याने येथील एका गावात तब्बल 400 जण अडकून पडले होते. विदर्भात (Vidarbha) पावसाचा जोर अद्याप कायम आहे. ठिकठिकाणी पूर आला. कित्तेकांना विस्थापीत व्हावे लागले. पुरामुळं जागोजागचे रस्ते बंद आहेत. याचा फटका रुग्ण तसेच प्रवाशांना बसला. वर्धा, गडचिरोलीतील पूरपरिस्थिती अतिशय गंभीर आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

