IndiGo Flight Chaos: इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका
इंडिगोच्या विमानसेवेतील गोंधळामुळे पुण्यासह देशभरात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. गेल्या चार दिवसांत २००० हून अधिक विमाने रद्द झाल्याने दिल्ली, मुंबईत प्रवासी अडकले आहेत. या प्रकरणी नरेंद्र मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची मागणी करत याचिका दाखल केली आहे. इतर विमान कंपन्यांनी तिकीट दर वाढवले असून, रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला आहे.
पुण्यात आज दिवसभरात इंडिगोची ४२ विमाने रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून इंडिगोच्या २००० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांची देशभरात, विशेषतः दिल्ली, मुंबई, बंगळूरू आणि चेन्नई विमानतळांवर तारांबळ उडाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी करणारी याचिका नरेंद्र मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी सरकारकडे या अडचणीच्या परिस्थितीत कोणते पर्याय आहेत, अशी विचारणा केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून समन्स बजावण्याची मागणीही करण्यात आली आहे. परिस्थिती १५ डिसेंबरपर्यंत पूर्वपदावर येण्याची शक्यता इंडिगो प्रशासनाने वर्तवली आहे. या गोंधळाचा फायदा घेत इतर विमान कंपन्यांनी तिकीटांचे दर वाढवले असून, भारतीय रेल्वेने अतिरिक्त कोच जोडून प्रवाशांना दिलासा दिला आहे.
Published on: Dec 06, 2025 09:57 AM
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
