AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Language Dispute : कल्याणमधील अर्णव खैरेच्या आत्महत्येचं कारण समोर, लोकलमधील भाषा वाद नाही तर...

Language Dispute : कल्याणमधील अर्णव खैरेच्या आत्महत्येचं कारण समोर, लोकलमधील भाषा वाद नाही तर…

| Updated on: Nov 23, 2025 | 11:11 AM
Share

भाषा वादातून कल्याणमधील १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. राजकीय वर्तुळात देखील यावरून एकमेकांवर टीका करत राजकारण केले जात असल्याचे राजकीय नेत्यांनी म्हटलंय.

कल्याणमधील अर्णव खैरेने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. लोकलमध्ये हिंदी-मराठीच्या मुद्द्यावरून अर्णवला मारहाण झाल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. कल्याणच्या कोलसेवाडी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र आता पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अर्णव खैरेचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

मुंबईत हिंदी-मराठी भाषेच्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याण येथील अर्णव खैरे मंगळवारी लोकलने मुलुंडला जात असताना ही घटना घडली होती. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने अर्णवने प्रवाशांना आगे सरको असे म्हटलं आणि यानंतर चौघांनी त्याला “मराठी बोलायला लाज वाटते का?” असे म्हणत मारहाण केली. याच प्रकरणात अपडेट समोर आली आहे.

Published on: Nov 23, 2025 11:11 AM