राज्यात पुन्हा लॉकडाऊन कधी लागणार? आरोग्यमंत्र्यांनी निकष सांगितला?
राज्यात ज्या दिवशी ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक दररोज लागेल, त्या दिवशी लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना इथं दिली. कोरोनाच्या लसी वाढवून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केलीय.
जालना : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना जिल्हाधिकारी कार्यलयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजेश टोपे यांनी स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर काल 9 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण करून उच्चांक केला असल्याचे सांगितले. लवकर लसीकर करणे हाच या महामारीवर उपाय असु शकतो, तसेच त्यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने लसी उपलब्ध झाल्यास आपण हा लसीकरणाचा 15 लाखा पर्यंत घेऊन जाऊ शकतो. रोज 10 लाख लसीकरण झाले तर दीड ते दोन महिन्यात राज्याचे लसीकरण पूर्ण होईल. या बाबत त्यांनी केंद्र सरकारला लसी वाढवून द्याव्यात, अशी विनंती केली. तर, राज्यात ज्या दिवशी ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक दररोज लागेल, त्या दिवशी लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना इंथ दिली.
Follow Us
Latest Videos
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

