संजय राऊत यांचं एखाद्या ज्योतिषासारखं झालंय, ते काही बोलतात!; कुणाचं टीकास्त्र
Sanjay Raut : संजय राऊत यांच्या बोलण्यात तथ्य नसतं, काहीही बोलतात, असं म्हणत संजय राऊतांवर टीका करण्यात आली आहे. कुणी केला हा घणाघात? पाहा...
मुंबई : संजय राऊत यांचं एखाद्या ज्योतिषासारखं झालंय. ते काय काहीही बोलतात आणि काही विधान करतात त्यांच्या बोलण्याला काही तथ्य नसतं, असं मंत्री दीपक केसरकर म्हणालेत. या राज्यामध्ये कोण कुणाचं गुलाम झालं आहे. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यांनी विचारधारा गहाण ठेवली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत संगत केली आहे. तेव्हाच ठाकरेगट त्यांचा गुलाम झाला, असं राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत जे विधान केलं ते चुकीचं आहे. जर बाळासाहेब ठाकरे असते तर या मुद्द्यावर त्यांनी लगेच युती तोडून टाकली असती. पण यांच्यात हिंमत नाही. उद्धव ठाकरेजी, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आघाडी तोडा, मविआतून बाहेर पडा, असं आव्हानही केसरकरांनी दिलं आहे.
बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्
नाशिक पुन्हा हादरलं! जादूटोण्याची धमकी, मानसिक छळ; सासरच्या जाचाला...
तामिळनाडूत सत्तास्थापनेचा सस्पेन्स; थलपतीच्या सरकार स्थापनेला ब्रेक
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..

