12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील जिल्ह्यांचा यात समावेश आहे. उमेदवारांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून, राखीव जागांसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक राहील.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा ठिकाणी या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ही माहिती आयोगाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या निवडणुका कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांमध्ये होणार आहेत. मतदारांना जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी असे दोन मते द्यावी लागतील.
उमेदवारांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबवली जाईल. राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणे बंधनकारक आहे.
Published on: Jan 13, 2026 04:39 PM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
