Maharashtra Cabinet : नाही मिळाला लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नव्या सरकारच्या एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने काही आमदार नाराज असल्याचे समोर येत आहे. हे नाराज असलेले आमदार राज्यातील विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सोडून आपल्या गावी, मतदारसंघात परतले आहेत.
नुकताच नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. भाजपच्या सर्वाधिक १९ मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या सरकारच्या एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने काही आमदार नाराज असल्याचे समोर येत आहे. हे नाराज असलेले आमदार राज्यातील विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सोडून आपल्या गावी, मतदारसंघात परतले आहेत. छगन भुजबळ हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजर राहिलेत. मात्र मंत्रिपदाचा पत्ता कट होताच ते आपल्या नाशिक येवला या मतदारसंघात परतले आहेत. तानाजी सावंत यांना देखील यंदा मंत्रिपदाची आशा होती. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांचाही नंबर न लागल्याने ते सुद्धा हिवाळी अधिवेशन सोडून पुण्यात परतले आहेत. तर माजलगावचे प्रकाश सोळुंके यांना देखील मंत्रिपदाची आस होती. मात्र त्यांचीही मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने ते बीड जिल्ह्यात परतलले आहेत. यासोबतच आमरावतीच्या रवी राणा यांनी यंदा मंत्री होण्याचा संकल्प धरला होता. मात्र मित्र पक्षात कोणालाही जागा न मिळाल्याने ते सुद्धा बॅग पॅक करून अमरावतीत परतले आहेत.
Published on: Dec 17, 2024 12:30 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
