AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manipur Flood : मणिपूरमध्ये मुसळधार! जनजीवन विस्कळीत, 3 हजार नागरिकांचं स्थलांतर

Manipur Flood : मणिपूरमध्ये मुसळधार! जनजीवन विस्कळीत, 3 हजार नागरिकांचं स्थलांतर

| Updated on: Jun 01, 2025 | 6:46 PM
Share

Manipur Flood News Updates : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंफाळ शहरात पुरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मणिपूरमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मणिपूरच्या इंफाळ शहरात अतिवृष्टीमुळे या पुरामुळे 3 हजार 800 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. तर पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात, विशेषतः इंफाळमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे, शुक्रवारी अनेक भागात पाणी साचल्याची नोंद झाली. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील काकवा, थांगमेईबंद आणि सगोलबंद भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. इम्फाळ आणि सेरौ नद्यांसह प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळीही लक्षणीयरीत्या वाढली आहे, ज्यामुळे संपूर्ण खोऱ्यात चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, ३ जूनपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील अधिकारी उच्च सतर्कतेवर आहेत.

Published on: Jun 01, 2025 06:46 PM