Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नंबरच्या आरोपीने खंडणीसाठी खुन करायला लावण्याचे सिद्ध झाले आहे. संतोष देशमुख यांचा खून केला हे सत्य आहे. पण हा खून धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच झाला असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मात्र सरकारने धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील यावेळी जरांगे यांनी केला आहे. ही सगळी चर्चा लोकांमध्ये होत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनीच मोर्चे काढायला लावले. रस्ता रोको आंदोलन करायला लावले. तसेच माझा संबंध नसताना माझ्या फोटोला धनंजय मुंडे यांनीच जोडे मारायला लावले. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी नियतीला ते मान्य नसतं. तुम्हाला याचे फळ मिळेल. सरकारने धनंजय मुंडे यांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ते आता शक्य होणार नाही. एक ना एक दिवस बदलणार आणि संतोष भैया देशमुख यांचा खून खटल्याचा योग्य तपास होईल, असा विश्वास यावेळी जरांगे यांनी व्यक्त केला. लोकांमध्ये याबद्दल चर्चा सुरू असून यावर तपास व्हायला हवा असंही जरांगे म्हणाले.
Published on: Mar 27, 2025 05:02 PM
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
