‘मराठा नेते काय करताय? मी एकटा पडलो तरी ठासून सांगतोय…’, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
मराठ्यांचे राज्य आहे आणि मग मराठ्यांवर अन्याय का…? मी एकटा पडलो नाही. मला आता मराठ्यांचे नेते फोन करत आहेत. ओबीसींचे नेते सर्व एक झाले आहेत. मग मराठे का एकत्र येत नाहीत म्हणून मी एकटा पडलो आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ओबीसी नेते एक झालेत, मराठा नेते काय करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे
ओबीसी नेते एक झालेत, मराठा नेते काय करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एकटा पडलोय तरी मी लढणार… ठासून सांगतोय.. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ‘मला खूप बोलले आहेत. जे आजू-बाजूला गेलेत त्यांनाही माहिती आहे. मला किती घाण बोलले आहेत. पण मी जातीसाठी पचवतोय. माझा म्हणण्याचा अर्थ एकच आहे की, ओबीसी नेते एक झालेत. मी एकटा पडलोय… मराठ्यांचे नेते काय करताय?’, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांनाच थेट अप्रत्यक्षपणे सवाल केलाय. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले, मी एकटा जरी राहिलो तरी लढणार…हे ठासून सांगतोय, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगत असताना १३ जुलै रोजी धमाका होणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा

