Mumbai | वरळी कोळीवाड्यात मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते समुद्राला नारळ अर्पण
वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्यापर्यंत आदित्य ठाकरे सायकलने आले. मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येत लोक सायकल, बाईक आणि काही लोक पायी चालत पोहोचले. तिथे त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून समुद्रात नारळ सोडला.
मुंबई : नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आज नारळ विसर्जनाकरीता वरळी कोळीवाड्यात आले होते. शिवसेना शाखा क्रमांक 159 येथे पोहोचल्यानंतर ते सायकल चालवित समुद्र किनाऱ्यापर्यंत गेले. वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्यापर्यंत आदित्य ठाकरे सायकलने आले. मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येत लोक सायकल, बाईक आणि काही लोक पायी चालत पोहोचले. तिथे त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून समुद्रात नारळ सोडला.
Latest Videos
Latest News