MNS : गुणरत्न सदावर्ते भाजपनं पाळलेला, त्याला चौकात उभं करून… मनसे नेत्याचा हल्लाबोल
‘कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंची मुजोरी पाहायला मिळाली. कोण येतं बघू म्हणजे तुझ्या बापाचा महाराष्ट्र आहे का? महाराष्ट्राचा सात बारा तुझ्यानावावर झालाय’, असं म्हणत सदावर्तेंनी एकेरी उल्लेख करत टीका केली. यानंतर मनसेने पलटवार केलाय.
गुणरत्न सदावर्ते हा भाजपाने पाळलेला माणूस आहे. अशा माणसाला चौकात उभं करून मारले पाहिजे. असाच सदावर्ते बोलत राहिला तर मराठी माणूस याला मारेल, असं म्हणत अविनाश जाधव यांनी सदावर्तेंच्या टीकेनंतर संताप व्यक्त केला. तर मुंबईत होणाऱ्या मोर्च्याबद्दल बोलताना अविनाश जाधव म्हणाले, मराठी माणसासाठी राज ठाकरे पहिले पाऊल उचलतात. हिंदी सक्तीविरोधातील ५ जुलैच्या मोर्चात ठाण्यातील कलाकार, विद्यार्थी पालक संघटना आमच्या सोबत आहेत. यासह अनेक संस्था, संघटना एकत्र येणार आहे, असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. पुढे अविनाश जाधव असेही म्हणाले की, इयत्ता १ ते ४ थी मातृभाषा शिकवली पाहिजे असे जाणकार सांगतात पण तुम्ही का सक्ती करता? हे दिल्लीश्वरला खुश करण्यासाठी चालू आहे, असं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी

