AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suyog Rajnekar | गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जातोय! MPSC पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; रोहित पवारांनीही केली शेअर

Suyog Rajnekar | गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जातोय! MPSC पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; रोहित पवारांनीही केली शेअर

| Updated on: Sep 03, 2026 | 3:26 PM
Share

MPSC परीक्षांमधील वाढत्या पेपरफुटी प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अमरावतीतील सुयोग राजनेकर या तरुणाने या गंभीर समस्येवर एक हृदयस्पर्शी कविता तयार केली आहे, जी सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. या कवितेतून त्याने आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, विद्यार्थ्यांच्या वेदनांना वाचा फोडली आहे आणि कठोर चौकशीची मागणी केली आहे.

MPSC परीक्षांमधील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशाच एका घटनेमुळे व्यथित झालेल्या अमरावती येथील सुयोग राजनेकर या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक हृदयस्पर्शी कविता तयार केली आहे. ही कविता सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही ती ट्वीट केली आहे.

सुयोग राजनेकर यांनी आपल्या कवितेतून, वर्षानुवर्षे अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेदना मांडल्या आहेत. पेपरफुटीमुळे गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आयोगाच्या भरतीवर असलेला विश्वास डळमळला असल्याचे ते सांगतात. कोरोनानंतर कटऑफमध्ये झालेल्या अस्वाभाविक वाढीमुळे पेपरफुटी आधीपासूनच सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, आयोगातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून आयोगाला स्वच्छ करावे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवावा. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सुयोग राजनेकर यांनी केली आहे.

Published on: Sep 03, 2026 03:26 PM

Follow Us