बीएमसीतील ‘त्या’ कार्यालयांवरून काँग्रेस महिला नेत्याचा भाजपवर हल्ला? लोढा यांचे थेट उत्तर म्हणाले, ‘कोणी आडवं…’
याच कार्यालयावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी, भाजपला केवळ मुंबईला लुटायचे आहे अशी टीका केली होती. तर बीएमसीमध्ये पालकमंत्र्यांसाठी कार्यालयाची काय गरज असा सवाल केला होता. त्यानंतर आता पुन्हा विधिमंडळात बीएमसीमधील लोढांच्या दालनावरून भाजपवर निशाण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निशाना साधला आहे.
मुंबई, 29 जुलै 2023 | बीएमसीच्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कार्यालयावरून सध्या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. याच कार्यालयावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी, भाजपला केवळ मुंबईला लुटायचे आहे अशी टीका केली होती. तर बीएमसीमध्ये पालकमंत्र्यांसाठी कार्यालयाची काय गरज असा सवाल केला होता. त्यानंतर आता पुन्हा विधिमंडळात बीएमसीमधील लोढांच्या दालनावरून भाजपवर निशाण काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निशाना साधला आहे. त्यांनी, बीएमसीची स्वायत्ता टिकली गेली पाहिजे. म्हणूनच त्याविरोधात विरोधक आवाज उठवत आहेत. आजपर्यंत तेथे कोणत्याही मंत्र्यांचे कार्यालय असं झालं नाही. वार्डामध्ये फक्त वार्डाचेच काम होत. मुख्य कार्यालयात कोणी येऊ शकत नाही. मंत्रालयात परवानगी शिवाय जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तेथे पालकमंत्री म्हणून समस्या निवारण कक्ष सुरू केल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी या कार्यालयावरून थेट आता विरोधकांनाच कसं आणि कोणतं आव्हान दिलं आहे पहा या व्हिडीओत
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

