Special Report | नाना पटोले म्हणतात, भापजकडून यंत्रणांचा गैरवापर
नाना पटोले यांनी हा गंभीर आरोप केला आहे तर त्यांनी त्याचा पर्दाफाश करावा अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर निवडणुकांमध्ये भाजपकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्यी पार्श्वभूमी केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांवर दबाव टाकला जात असल्याची टीका भाजपवर करण्यात आल्यानंतर भाजपनेही नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी त्यांची ही टीका म्हणजे विधान परिषदेच्या निकालानंतर द्यावी लागणारी काँग्रेसची प्रतिक्रिया आहे असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी हा गंभीर आरोप केला आहे तर त्यांनी त्याचा पर्दाफाश करावा अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.
Latest Videos
Latest News