Cyrus Mistry | सायरस मिस्त्रींच्या अपघातासाठी ‘ही’ कारणं? पोलीस अहवाल काय सांगतो?
पोलीस विभागातर्फेही अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या अहवालात महामार्गावरील त्रुटींवर बोट ठेवलंय.
मुंबईः टाटा ग्रुपचे (Tata Group) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील तपासात पोलीस अहवालात काही बाबी उघड झाल्या आहेत. महामार्गावरील एनएचएआयने (NHAI) केलेल्या त्रुटींवर या अहवालात बोट ठेवण्यात आलंय. हा महामार्ग तीन लेनचा असतानाही प्रत्यक्षात तो दोनच लेनचा करण्यात आलाय. तसेच या मार्गावर चालकांनी सावधानता बाळगावी, याकरिता सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. रस्ता दुभाजक आणि पुलावर पिवळे ब्लिंकर्सदेखील लावण्यात आलेले नाहीत, असं पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. 5 सप्टेंबर रोजी सायरस मिस्त्री यांचा पालघर जवळ अपघाती मृत्यू झाला. ते ज्या गाडीत बसले होते, त्या मर्सिडीज बेंझमध्ये काही बिघाड होता का, यादृष्टीनेही खास जर्मनीतील पथकाने तपास केला. तसेच राज्यातील पोलीस विभागातर्फेही अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या अहवालात महामार्गावरील त्रुटींवर बोट ठेवलंय.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक

