दक्षिण मुंबईतील बत्तीगुल, रेल्वेचा खोळंबा
टाटा ग्रीड फेल्यूअर (Tata Grid failure) झाल्याने दक्षिण मुंबईत (south Mumbai) वीज पुरवठा (Power outage) खंडित झाला.
मुंबई: टाटा ग्रीड फेल्यूअर (Tata Grid failure) झाल्याने दक्षिण मुंबईत (south Mumbai) वीज पुरवठा (Power outage) खंडित झाला. कुलाबापासून ते कुर्ल्यापर्यंत आणि चर्चगेटपासून ते विरारपर्यंत वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. बत्तीगुल झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसही अंधारात गेले होते. वीज पुरठा खंडित होण्याचा सर्वाधिक फटका फोर्ट परिसर, दादर, माटुंगा, भायखळा, शीव, परळ, वरळी आणि प्रभादेवी परिसराला बसला होता. त्यामुळे अनेकांनी बेस्ट प्रशासनाच्या कार्यालयात फोन करून वीज पुरवठा खंडित झाल्याबाबतच्या तक्रारी करतानाच हा पुरवठा कधी सुरू होणार अशी विचारणाही केली. तसेच वीज नसल्याने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचाही खोळंबा झाला. मात्र, आज रविवारचा दिवस असल्याने चाकरमान्यांची गैरसोय झाली नाही. तब्बल तासाभराच्या खोळंब्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाश्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
